बाल विद्यामंदिर मध्ये साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती व बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी
सह्याद्री प्राईम टाईम न्युज प्रतिनिधी
पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे.
असे परखड विचार मांडणारे लेखक, कवी ,साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती. तसेच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे
आणि तो मी मिळविणारचअशी सिंहगर्जना करणारे केसरी व मराठा वृत्तपत्राच्या माध्यमातून जनजागृती करणारे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचे नेते बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी बाल विद्या मंदिर या शाळेमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी शाळेतील भक्ती खिलारी साई पाटील, रुद्र दिघे, स्पर्श दंडे ,वज्रेश्वरी मोरे या विद्यार्थ्यांनी बाळ गंगाधर टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयीची माहिती अतिशय सुंदर अशा शब्दांमध्ये सांगितली. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे भारतातील पहिले लेखक आहे
ज्यांचे साहित्य हिंदी, गुजराती ,उडिया बंगाली तमिळ , मल्याळी या भारतीय भाषांबरोबरच रशियन, झेक, पोलिश इंग्रजी, फ्रेंच अशा जगातील 27 भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे. तेरा लोकनाट्य ,१३ कथा संग्रह,३५ कादंबऱ्या ,१५पोवाडे ७ चित्रपट कथा, ३ नाटके एक प्रवास वर्णन व एक शाहिरी पुस्तक प्रसिद्ध आहेत.
अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. “जात हे वास्तव आहे. गरीबी ही कृत्रिम आहे गरीबी नष्ट करता येऊ शकते पण जात नष्ट करणे ही आपल्या सर्वांचे काम आहे
“अशा प्रकारचे विचार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी जनसामान्यांपर्यंत पोहोचविले. कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना निरनिराळ्या प्रकारची वृक्षांची रोपे वाटप करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री. हेंद्रे दत्तात्रेय यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती आढाव अलकादेवी या होत्या. सूत्रसंचलन श्रीमती बर्डे मीना यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक श्री गुलाब मोरे सर तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी मोलाचे सहकार्य केले. आभार प्रदर्शन श्री संदीप रासकर सर यांनी केले.























